वरोरा शहर राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक - खा. बाळूभाऊ धानोरकर

वरोरा शहर राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक
- खा. बाळूभाऊ धानोरकर



वरोरा (प्रती) शहरात विविध जाती व समुदायाचे लोक आहेत. धर्माच्या कार्यपद्धतीत अनेक फरक असूनही सर्वधर्मीय एकत्र येऊन सर्वधर्म समभाव या वृत्तीने मोठ्या उत्साहात एकमेकांच सण साजरा करतात. राज्यात राजकीय व सामाजिक वातावरण सध्या गढूळ झाले असताना सुद्धा शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित होती. राष्ट्रीय एकात्मता जपणे ही शहराची संस्कृती आहे. त्यामुळे वरोरा शहर राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक बनले आहे, असे प्रतिपादन खासदार बाळूभाऊ धानोरकर यांनी केले. रमजान ईदचे औचित्य साधून मुस्लिम समाज संघर्ष समिती, वरोरा तर्फे स्थानीक आशीर्वाद मंगल कार्यालयात 'ईद मिलन समारोह ' आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी अध्यक्षीय भाषणात करताना ते बोलत होते.
व्यासपीठावर सत्कारमूर्ती  म्हणून आमदार प्रतिभा धानोरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी ( आयपीएस ) आयुष नोपानी, माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली,  माजी न.प. सभापती छोटूभाई शेख, विशेष आमंत्रित उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, अतिथी म्हणून एमआयएमचे राज्य प्रवक्ते प्रा. जावेद पाशा, सामाजिक कार्यकर्ते रमेश राजूरकर, भाजपा नेता बाबा भागडे, राष्ट्रवादीचे विलास नेरकर, शिवसेनेचे चंद्रपूर जिल्हा प्रमुख मुकेश जीवतोडे प्रामुख्याने उपस्थित होते. 
  खासदार धानोरकर पुढे म्हणाले की, आज देशात थाली बजाओ, भोंगा निकालो, अशी फालतुगिरी, नेतागिरी चालू आहे.  'हे नका करू, ते नका करू ' अशा तमाशा सुरू आहे. इथे कुणाची दादागिरी चालणार नाही. हे संबंधितांनी लक्षात ठेवावी, असा इशारा देत राज्यात वर्षोनुवर्षे जे होत आहे, तेच होणार, असेही ते म्हणाले. 
     आमदार प्रतिभा धानोरकर म्हणाल्या की, शहरात सर्व एकत्र येऊन धार्मिक सण साजरे करतात. या माध्यमातून एकात्मतेचा संदेश मागील अनेक वर्षांपासून दिला जात आहे. अजमेर शरीफवर आमची श्रद्धा असल्याने आम्ही न चुकता दरवर्षी अजमेरला जातो. येथील मुस्लिम बांधव शेगांव, शिर्डीला दर्शनासाठी जातात. कोणी कोणत्या देवा धर्मावर श्रद्धा ठेवावी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. जातीवादी राजकारण न करता सर्वांसाठी समानतेच्या दृष्टीने न्याय देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहिला आहे.
    पाशा यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, काही विशिष्ट लोक  आपल्या निहीत स्वार्थासाठी नाहक विषय घेऊन हिंदू - मुस्लिम यांच्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शिवाजी महाराजांच्या धर्मनिरपेक्ष वृत्तीचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, रायगडावरील बांधकाम पाहण्यासाठी शिवाजी महाराज गेले होते तिथे हिंदू धर्मियांसाठी व्यवस्था करण्यात आल्याचे दिसले. यावेळी त्यांनी सुक्ष्म निरिक्षण करुन मुस्लिम रयतेसाठीही व्यवस्था करण्याचे आदेश दिले. त्यांच्यासाठी मानवता धर्म श्रेष्ठ होता. असाच सामाजिक सलोखा वरोऱ्यात कायम राहील.
    नोपानी म्हणाले की, विविध धार्मिक सणात येथील शांतताप्रिय व परोपकारी नागरिकांचा प्रत्यय आला.
   यावेळी उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे, रमेश राजूरकर, बाबा भागडे, मुकेश जीवतोडे, छोटू शेख, अहेतेशाम अली यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, वरोरा तालुक्यात कधींही जातीय तेढ निर्माण झाले नाही व यापुढेही होणार नाही.
     तत्पूर्वी  मुस्लिम समाज संघर्ष समिती तर्फे मुस्लिम समाज भवनासाठी जागा, निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार प्रतिभा धानोरकर, माजी नगराध्यक्ष अहेतेशाम अली, माजी न.प. सभापती छोटू शेख तथा उल्लेखनीय योगदानाबद्दल उपविभागीय पोलिस अधिकारी आयुष नोपानी यांचा शाल, बुके देऊन सत्कार करण्यात आला.  आमदार खासदार निधीतून मुस्लिम कब्रस्थानसाठी  निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल माजरी, नागरी,चंदनखेडा, शेगांव (बु) येथील मज्जीद कमेटीच्या  वतीने खासदार/आमदार  यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
   यावेळी विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी शाबान शेख, मुश्ताक अली, डॉ.शेख, डॉ.टेकाम, फिरोज सिद्दीकोट,  मोहसीन अख्तर, आनंदवन मित्र मंडळाचे डॉ. वाय. एस. जाधव, प्रा. बळवंत शेलवटकर, राजेंद्र मर्दाने, दीपक शिव, राहुल देवडे, रवी चौहान, डॉ. प्रशांत खुळे, बाळू जीवणे, सुनिल सिरसाट, राजू मिश्रा, राजू कश्यप, वैभव डहाणे, एड. रोशन नकबे, हितेश राजनहिरे,  प्रमोद काळे, सलीम पटेल, नबी कुरेशी, अजय रेड्डी,  नुतेश कुंभारे व शहरातील नागरिक ईद मिलन समारोहासाठी उपस्थित होते.
  प्रास्ताविक अशफाक शेख यांनी केले. सूत्रसंचालन राहील पटेल यांनी तर आभारप्रदर्शन मोहसीन हाशमी यांनी केले.
     कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी   अयुब खान, मोहम्मद शेख, शाहीद अख्तर, पाशा काजी, बशीर कुरेशी, बशीर अन्ना, मोहसिन पठाण, शब्बीर शेख, कादर शेख, शकील खान, अफसर शेख, अब्रार शेख, अरशद मलिक, अकिल खान, आशिक अजानी, इक्बाल शेख, जमील शेख, नदीम शेख, जाकीर शेख, इरफान रंगरेज,मिन्हाज अली,अनीस शेख आदींनी सहकार्य केले.
 कार्यक्रमानंतर उपस्थितांनी शीरखुर्मा व भोजनाचा आस्वाद घेतला.

Post a Comment

0 Comments