बारावीत शिकत असलेल्या विद्यार्थिनींची गळफास घेऊन आत्महत्या

बारावीत शिकत असलेल्या विद्यार्थिनींची गळफास घेऊन आत्महत्या
आत्महत्येचे कारण गुलदस्त्यात
वरोरा(प्रती)वरोरा शहरालगत असलेल्या  बोर्डा  (आराध्य लॉनच्या मागे )येथील रहिवासी व बारावीत शिकत असलेल्या एका विद्यार्थिनींने गळफास घेऊन आत्महत्या केली, सदर घटना दि,१०/०३/२०२२रोजी साय६;३०ते७;००च्या दरम्यान घडली
हिरालाल लोया कनिष्ठ महाविद्यालय वरोरा येथील १२व्या वर्गात शिकत असलेली अनन्या चंद्रशेखर चिमुरकर(१८)हिने आपल्या राहत्या घरी ओढणीच्या साह्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली, अनन्याने नुकतेच१२बोर्डाच्या परीक्षेचे दोन पेपर दिले असता, उर्वरित चार पेपर बाकी होते,घटनेच्या दिवशी भाऊ दिवटीवर गेला होता, व तिची आई घरी आपल्या कामात व्यस्त असतांना , या संधीचा फायदा घेत तिने गळफास लावलाअशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली ,ती सातत्याने आजारी ही राहत असल्याची माहिती मिळाली असून वडील चंद्रशेखर चिमुरकर यांच्या पहिल्या मुलीचा काही वर्षा अगोदर चंद्रपूर येथे  स्विमिंग पुलामध्ये मृत्यू झाला होता, यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती,आणि अनन्या ही दत्तक मुलगी असल्याचे समजते,  ,कुठल्या कारणामुळे गळफास लावला हे अद्याप कळले नसून
 वरोरा पोलीस अधिक तपास करीत आहेत,

Post a Comment

0 Comments