केंद्र सरकारव्दाराच युवकांची मुस्कटदाबी - काँग्रेस प्रवक्ता अमर गोंडाने यांचा घणाघात


केंद्र सरकारव्दाराच युवकांची मुस्कटदाबी
     -काँग्रेस प्रवक्ता अमर गोंडाने यांचा घणाघात
     
वरोरा(प्रती)भारत देश हा 50 %  युवकांचा देश आहे. याचं युवकांचा भरवशावर आपण महासत्ता होण्याचं स्वप्न बघत आहे मात्र तरी याचं युवकांचा आवाज दाबण्याचं काम केंद्र सरकारद्वारा होत आहे" असे वक्तव्य युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता अमर गोंडाने यांनी यवतमाळ येथे पत्रकार परिषेदेत केले.
      युवक काँग्रेसद्वारा आयोगित *यंग इंडिया के बोल -2* या स्पर्धेची माहिती देत असतांना या स्पर्धेच्या माध्यमातून देशातून प्रवक्ता निवडीची प्रक्रिया पार पडणार असून हेच प्रवक्ता केंद्र सरकारचा खोटेपणाचा डाव पाडेल व सर्व सामान्य तळागळातील जेनतेपर्यंत भाजपाच पितळ उघड पडण्याचं काम युवक करतील.
    या वेळी अमर गोंडाने यांनी बोलतांना विविध भूमिका मांडल्यात त्यात प्रामुख्याने महागाई,बेरोजगारी,महिला अन्याय अत्याचाराबाबत प्रश्न, शेतकरी,कामगार, कष्टकरी तसेच युवकांचे प्रश्नावर देतांना ते बोलत होते. भारतीय अर्थव्यवस्थेचा कना असलेल्या शेतकऱ्यांवरीन अन्याय विसरता येणार नाहीत, आपल्या संविधानीक अधिकाराचा उपयोग करत शेतकरी आंदोलन करतात तर भाजपचे नेते त्यांच्यावर गाड्या चालून हत्त्या करतात. तसेच 2014 च्या नंतर किती स्त्री मुक्ती मेळावे, स्त्री मुक्ती व्याख्याणे, स्त्री मुक्ती आंदोलन बंद झालीत असा सवाल त्यांनी पत्रकार परिषेदेत केला,
       केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर करून विरोधकांना फसवण्याचं काम केंद्रातील भाजप सरकार करत आहे. त्यामुळे लोकशाही सुद्धा धोकात आली असून देश हुकूमशाहीकडे अग्रेसर आहे.
हे सर्व अतिमहत्वाचे प्रश्न असतांना मात्र काही प्रसार माध्यमे हिंदू मुस्लिम या विषयाच्या पलीकडे जायला तयार नाहीत. म्हणून युवक काँग्रेस युवकांची प्रवक्ता म्हणून फळी तयार करत असून हे प्रवक्ता भाजपचा खोटेपणाचा डाव हाणून पडल्याशिवाय राहणार नाही असे ते पत्रकार परिषेदेत बोलले.
     या वेळी यवतमाळ युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष उन्मेष पुरके, उपाध्यक्ष प्रमोद बगाडे, विधानसभा अध्यक्ष स्वानंद चौहान व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments