नशीब बलवत्तर म्हणून "त्या" पाच जणांचे प्राण वाचले?

नशीब बलवत्तर म्हणून 
"त्या" पाच जणांचे प्राण वाचले?

अनियंत्रित ट्रक दुभाजक तोडून  उभ्या वाहनावर आदळला



वरोरा(प्रती) नागपूरवरून चंद्रपूरकडे  जाणाऱ्या एका ट्रक वरील चालकाचा ताबा सुटल्याने अनियंत्रित झालेला ट्रक मुख्य रस्त्यावरून दुभाजक तोडून सर्विस रोड वर उभ्या असलेल्या वाहनावर आदळल्याने अपघात झाला ,नशीब बलवत्तर म्हणून या अपघातात पाच जणांचे  प्राण वाचले .
ही घटना दि.१७/११/२०२२ रोजी दु.३:३० वाजताच्या  दरम्यान बोर्डा चौकात घडली 
ट्रक क्रमांक MH३१ -CQ ४२०१
हा नागपूर वरून चंद्रपूरकडे भरधाव वेगाने जात होता बोर्डा चौकात येतात अचानक ट्रक वरील चालकाचा ताबा सुटला आणि अनियंत्रित झालेला ट्रक मुख्य रस्त्यावरून दुभाजक तोडून सर्विस रस्त्यावर उभ्या असलेल्या एका माल वाहनावर व एका दुचाकी वर आदळला, यामुळे वाहनाचे मोठे नुकसान झाले या अपघातात ट्रक चालक जखमी झाला मात्र नशीब बलवत्तर  म्हणून त्या पाच जणांचे प्राण वाचले 
अपघात झालेल्या ठिकाणावर मुजाहिद कुरेशी यांचे कुरियर सर्विस चे दुकान आहे ,वणीवरून आलेल्या माल वाहनातून कुरिअरचे पार्सल मुजाहिद कुरेशी यांच्या दुकानात खाली करण्यात आले होते, दुकानात काम करणारे दोघे आणि माल वाहकाचा चालक आणि इतर दोघे हे एकूण पाच चहा पिण्यासाठी बाजूच्याच पान टपरीवर काही मिनटापूर्वी निघून गेले होते, आणि याच क्षणार्धात सदर अपघात झाला त्यामुळे त्यांचे प्राण वाचले ,ट्रकचालक टूनटून सिंग भानसिंग सिंग वय २८वर्ष रा. राजुरा यांच्याविरुद्ध २७९ नुसार भादंवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला पुढील तपास वरोरा पोलीस करीत आहे,

Post a Comment

0 Comments