आपण लावलेला एक वृक्ष येणाऱ्या पिढीसाठी वरदान ठरू शकते-अहेतेशाम अली

आपण लावलेला एक वृक्ष येणाऱ्या पिढीसाठी वरदान ठरू शकते-अहेतेशाम अली
        
                वरोरा (प्रती )बोर्डा येथील स्थानिक नागरिकांकडून वृक्षारोपन कार्यक्रम घेण्यात आले.या कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. अहेतेशाम अली,माजी नागराध्यक्ष न. प. वरोरा तथा जिल्हा सचिव भाजपा चंद्रपुर, कार्यक्रर्माचे अध्यक्ष- श्री. खामनकर जी, प्रमूख पाहुणे म्हणून-घानोडे सर, जुनघरे सर, होते*. *या प्रसंगी बोर्डा वासियांतर्फे श्री.अहेतेशाम अली यांचे स्वागत व सत्कार करण्यात आले. अहेतेशाम अली यांनी आपले मत मांडतांना सांगितले की आपल्या जगाचा भवितव्यासाठी आपल्या येणाऱ्या पिढीसाठी जास्तीत जास्त झाडे लावणे खूप गरजेचे आहे.मुलांना द्यावे एकच शिक्षण, वसुंधरे मुळे आहे आपल रक्षण..असे मत व्यक्त केले, या कार्यक्रमात श्री मनोहर खिरटकर,श्री देवगडे,श्री वरभे, श्री मेश्राम श्री तितरे श्री चीडे श्री गोंडे श्री आशुटकर श्री सातपुतेजी,श्री कोल्हेसरजी,श्री जाधव सर,श्री क्षिरसागरस साहेब,श्रीवास्तव जी, श्री मडके सर,श्री ताजने,श्री धानोरकर साहेब,श्री खंगार,श्री देवगिरकर श्रीमती गोखरे मॅडम,श्री चमाटेजी श्री बांदुरकर सर, श्री लभाने सर श्री गेडेकर,श्री जूनघरे सर या सर्वांची उपस्थिती होती.*

Post a Comment

0 Comments