आज राज्यस्तरीय पुरोगामी साहित्य संमेलन बल्लारपूरात

आज राज्यस्तरीय पुरोगामी साहित्य संमेलन बल्लारपूरात 


विविध क्षेत्रातील दिग्गजांची हजेरी 



चंद्रपूर (जिल्हा प्रतिनिधी):
दिनांक-२४ फेब्रुवारी-२०२४ रोजी होऊ घातलेल्या पहिल्या राज्यस्तरीय पुरोगामी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.कार्यक्रम परिसराला महाकवी वामनदादा कर्डक साहित्य नगरीं,असे नाव देण्यात आले असून,सभागृहाच्या दालनाला शहिद नरेंद्र दाभोडकर तर विचार मंचाला जेष्ठ पत्रकार शहिद गौरी लंकेश यांचे नाव देण्यात येणार आहे.औद्योगिक नगरीं म्हणून ओळख असलेल्या बाल्ल्लारपूर शहरातील राजे बल्लाळशाह नाट्य गृहात हे पहिले राज्यस्तरीय पुरोगामी साहित्य संमेलन आज संपन्न होणार आहे.
         सकाळी ९:०० वाजता कार्यक्रमाचे उदघाट्न प्रख्यात विचारवंत प्रा.शाम मानव यांच्या हस्ते होणार असून,संमेलनाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध साहित्यिक मा.शिवा इंगोले (मुंबई),हे या संमेलनाला लाभले आहेत.विशेष अतिथी- मा.निता चापले मॅडम(राष्ट्रीय माजी महिला क्रिकेटर,लेखिका,तथा समाजिक कार्यकर्ता)मुंबई.
प्रमुख उपस्थिती-मा.विजय सूर्यवंशी रायगड. (संस्स्थापक अध्यक्ष,पुरोगामी पत्रकार संघ,भारत),
मा.बाळासाहेब आटांगळे,मुंबई. (राष्ट्रीय कार्याध्यक्ष,पुरोगामी पत्रकार संघ)
मा.संतोष जाधव,नाशिक(राज्य अध्यक्ष,पुरोगामी पत्रकार संघ,भारत)
मा.निलेश ठाकरे(राज्य सचिव,(पुरोगामी पत्रकार संघ,भारत) तर
स्वागताध्यक्ष म्हणून प्रसिद्ध साहित्यिक प्रब्रम्हानंद मडावी हे भूमिका बजावणार आहेत.
           दुपारी :१२:०० वाजता 
प्रा.इसदास भडके.यांच्या अध्यक्षतेत निमंत्रितांचे कवी संमेलनाचे आयोजन केले आहे.या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध कवी,गीतकार खेमराज भोयर करतील.या कवी संमेलनात राज्यातील प्रसिद्ध कवी सहभाग घेणार आहेत.
दुपारी २:०० वाजता प्रसिद्ध वक्ता,पुरोगामी विचारवंत प्रा.जावेद पाशा,नागपूर यांचे
'शिवकालीन मुस्लिम मावळ्यांची भूमिका आणी बादशाह बहादूरशाह जफर यांच्या पर्यंतचा प्रवास' या विषयावर वाख्यान असेल. दुपारी ३:०० वाजता विलास थोरात,अमरावती यांचा "हल्ला बोल" हा एकपात्री प्रयोग
सादर करण्यात येणार आहे.
सायंकाळी -४:०० वाजता विवेक मोरे,अध्यक्ष उठाव साहित्य मंच मुंबई यांच्या अध्यक्षेते खाली विद्रोही कवी संमेलन होणार आहे.या कवी संमेलनाचे सूत्र संचालन-प्रसिध्द आंबेडकरी कवी बबन सरवदे,मुबंई करतील.
        संयकाळी-५३०:वाजता माजी राष्ट्रीय महिला क्रिकेटर,लेखिका,समाजिक कार्यकर्त्या तथा मार्गदर्शक
निता चापले,मुंबई यांची प्रगट मुलाखत. सायंकाळी ६:३० वाजता संजय घरडे,अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली गजल संमेलन आयोजित केले आहे.या गजल संमेलनाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध गजलकार जगदीश भगत,वर्धा हे करतील.सायंकाळी ७:३० वाजता पुस्तक प्रकाशन सोहळा संपन्न होईल.कवयित्री संगीता घोडेस्वार यांचा समतेचा एल्गार (कविता संग्रह) तर प्रसिद्ध साहित्यिक रंगशाम मोडक यांचा
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणी आदिवासी समाज या शोध ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येईल.
         सायंकाळी ८:०० वाजता
राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारोह संम्पन्न होणार असून पवन भगत(चंद्रपूर) यांच्या मराठी कादंबरी 'ते पन्नास दिवस' साठी
अण्णाभाऊ साठे राज्य स्तरीय साहित्य गौरव पुरस्कार-२०२४,माजी राष्ट्रीय महिला क्रिकेटर निता चापले (मुंबई) यांना राजमाता जिजाऊ राज्य स्तरीय गौरव पुरस्कार-२०२४, रतनकुमार साळवे(संभाजी नगर) यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय पत्रकारिता गौरव पुरस्कार-२०२४,विजय भसारकर (वरोरा) यांना क्रांतिज्योती सावित्री फुले राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार २०२४,
मा.रजिया हेमंत मानकर(बल्लारपूर)यांना
फातिमा शेख राज्यस्तरीय शिक्षण गौरव पुरस्कार-२०२४,
शहिद भगत सिंग राज्यस्तरीय युवा साहित्य गौरव पुरस्कार-२०२४.श्रुंखलं खेमराज भोयर(नागपूर)यांच्या पहिल्या इंग्रजी काव्य संग्रहासाठी तर
राज्यस्तरीय युवा कला गौरव पुरस्कार-२०२४.कु स्नेहल शिरसाट (वरोरा) हिला प्रदान करण्यात येणार आहे.
         रात्री ९:०० वाजता संमेलन अध्यक्ष्यांचे अध्यक्षीय भाषण होईल रात्री-९:३० वाजता विद्रोही जलसा या कार्यक्रमाने या साहित्य संमेलनाचा समारोप करण्यात येईल.
          संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात असून,हे पहिले पुरोगामी साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत.जास्तीत जास्त साहित्य रसिक प्रेमींनी या साहित्य संमेलनाला हजेरी लावून हे संमेलन यशस्वी करावे,असे आवाहन पुरोगामी साहित्य संसदेचे महाराष्ट्र अध्यक्ष नरेंद्र सोनारकर,विदर्भ अध्यक्षा एड.योगिता रायपूरे, 
आदींनी केले आहे.

Post a Comment

0 Comments